IPL 2025: वानखेडेवर mi vs rcb – रोहित-कोहली आमनेसामने, दोघंही रचणार इतिहास?

वानखेडेवर विराट-रोहित आमनेसामने! बुमराह परततोय, इतिहास घडण्याची शक्यता; mi vs rcb चा थरार आज संध्याकाळी पहिला विसरू नका.

मुंबई – IPL 2025 मध्ये आज वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांचे लक्ष वेधणारा mi vs rcb असा सामना रंगणार आहे. पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स आणि सध्याच्या फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात हा सामना होणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज – रोहित शर्मा आणि विराट कोहली – यांच्यात थेट टक्कर पाहायला मिळणार आहे, आणि त्याचबरोबर दोघंही मोठ्या वैयक्तिक टप्प्यांच्या उंबरठ्यावर आहेत.

मुंबईसाठी परतला ‘बुमराह’

मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची. मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी सामन्याआधी बुमराह फिट असल्याचं जाहीर केलं, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीतसुद्धा, बुमराहने लक्ष वेधून घेतलं आहे.

मुंबई इंडियन्सची डगमगती सुरुवात

या मोसमात मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत चार सामन्यांतून तीन गमावले आहेत. संघाच्या फलंदाजीची अवस्था चिंताजनक असून फक्त सूर्यकुमार यादव आणि रयान रिकेल्टन यांनी अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा, जो लखनऊविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही, त्याची कामगिरीही या मोसमात विशेष चमकदार ठरलेली नाही. त्याचप्रमाणे, तिलक वर्माने सुरूवात चांगली केली असली तरी मोठी खेळी उभारण्यात अपयश आलं आहे.

बंगळुरूच्या संधी वाढल्या

बंगळुरू संघासाठी ही एक मोठी संधी आहे की मुंबईच्या कमकुवत फलंदाजीचा फायदा घेत, गुणतालिकेत वर सरकावं. विराट कोहलीने हंगामाची सुरुवात 59 नाबाद धावांनी केली होती, पण त्यानंतर तो सातत्य राखू शकलेला नाही. मात्र फिल सॉल्ट आणि देवदत्त पडिक्कल यांनी काही स्फोटक खेळ केल्याने, बंगळुरूच्या फलंदाजीची ताकद स्पष्ट आहे. कर्णधार राजत पाटीदार मधल्या फळीत स्थिरता देत आहे.

हे पण वाचा..test movie चा नेटफ्लिक्सवरील प्रवास: क्रिकेटच्या मैदानातील  संघर्षाची कहाणी

बोलिंगची ताकद

बंगळुरूची गोलंदाजी मजबूत असून, जोश हेजलवूड आणि भुवनेश्वर कुमार हे पॉवरप्लेमध्ये नियंत्रण ठेवतात. मात्र फिरकी गोलंदाजांचा प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टची जोडी एकदम प्रभावी ठरू शकते. दीपक चाहर आणि मिचेल सँटनरसारखे अष्टपैलू गोलंदाज मुंबईसाठी निर्णायक ठरू शकतात.

mi vs rcb पिच आणि हवामान रिपोर्ट

वानखेडेवरील लाल मातीचे खेळपट्टीवर चांगला उंचीचा उडका मिळतो, ज्यामुळे फलंदाजांना सुरुवातीपासूनच फटकेबाजी करता येते. मैदान छोटं असल्याने धावसंख्याही मोठी होण्याची शक्यता आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ड्यूसमुळे अधिक योग्य मानला जातो. हवामान उष्ण असून, पाऊस होण्याची शक्यता नसल्याने सामना पूर्ण खेळला जाईल.

mi vs rcb दोन्ही संघांची संभाव्य playing XII

मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
Playing XIIPlaying XII
1रोहित शर्मा1फिल सॉल्ट
2विल जॅक्स2विराट कोहली
3रयान रिकेल्टन3देवदत्त पडिक्कल
4सूर्यकुमार यादव4राजत पाटीदार (क)
5हार्दिक पांड्या (क)5लियाम लिव्हिंगस्टन
6नमन धीर6जितेश शर्मा (यष्टी)
7मिचेल सँटनर7टिम डेविड
8दीपक चाहर8क्रुणाल पांड्या
9जसप्रीत बुमराह9भुवनेश्वर कुमार
10ट्रेंट बोल्ट10जोश हेजलवूड
11विघ्नेश पुथूर11यश दयाळ
12इम्पॅक्ट: तिलक वर्मा12इम्पॅक्ट: सुयश शर्मा

mi vs rcb आगामी माइलस्टोन्स:

रोहित शर्मा फक्त दोन षटकारांपासून वानखेडेवर 100 IPL सिक्स पूर्ण करणार आहे. त्याचबरोबर त्याला टी२० क्रिकेटमध्ये 1,600 चौकारांची टप्पा गाठण्यासाठी फक्त तीन चौकारांची गरज आहे.

विराट कोहली 13,000 टी२० धावांपासून फक्त 17 धावा दूर आहे. तो वानखेडेवर आपला 100वा चौकार देखील मारू शकतो, ज्यासाठी त्याला फक्त तीन चौकारांची आवश्यकता आहे.

हार्दिक पांड्या तीन चौकारांनी 400 टी२० चौकार आणि 100 IPL वानखेडे चौकार पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर, दोन बळी घेतल्यास तो 200 टी२० विकेट्स गाठेल.

सूर्यकुमार यादव RCB विरुद्ध 500 IPL धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असून, तिलक वर्मा चार चौकारांनी 100 IPL चौकारांचा आकडा गाठेल.

RCB खेळाडूंचे टप्पे:

फिल सॉल्टला फक्त दोन चौकारांनी 1,000 टी२० चौकार पूर्ण करायचे आहेत. राजत पाटीदारला 104 धावांनी 1,000 IPL धावा आणि आठ चौकारांनी 200 टी२० चौकार गाठायचे आहेत. क्रुणाल पांड्या एका षटकाराने 100 टी२० सिक्स आणि दोन विकेट्सने 150 टी२० विकेट्स गाठेल.

mi vs rcb आज वरचा इतिहास

मुंबई आणि बंगळुरूने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 33 सामने खेळले असून, त्यापैकी 19 सामने मुंबईने तर 14 RCB ने जिंकले आहेत. वानखेडेवर दोन्ही संघांनी 11 सामने खेळले असून, फक्त तीन वेळा RCB ला विजय मिळवता आला आहे. शेवटचा विजय 2015 मध्ये होता.

आजचा mi vs rcb सामना केवळ दोन संघांमधील संघर्ष नसून, तो भारताच्या दोन महान फलंदाजांच्या इतिहासाचा भाग ठरणार आहे. वानखेडेवरची संध्याकाळ काहीतरी खास घेऊन येणार, यात शंका नाही.

हे पण वाचा..motorola edge 60 fusion भारतात लॉन्च; दमदार प्रोसेसर, Sony कॅमेरा आणि आकर्षक वैशिष्ट्ये

Written By

माझं नाव आहे गौरव चव्हाण मी youtube, facebook आणि instagram या social media platform वरती मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या देत असतो. त्याच बरोबरच instagram Reels मध्ये tech videos बनवतो.

More From Author

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *