shivani rangole poem viral video : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Shivani Rangole हिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. तिचा निरागस अभिनय आणि अधिपती-अक्षरा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. काही महिन्यांपूर्वी ही मालिका संपली असली, तरी शिवानीचा चाहता वर्ग आजही तिला मनापासून फॉलो करतो.
अभिनयाबरोबरच Shivani Rangole ही सोशल मीडियावर सक्रिय असून, ती वेळोवेळी विविध पोस्ट, छायाचित्रं आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधते. नुकताच तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्वतःची कविता सादर करताना दिसते. तिच्या कवितेचा विषय जीवनातील प्रवाह, स्थैर्य आणि आत्मचिंतनावर आधारित आहे.
कवितेतील काही ओळींमध्ये ती म्हणते –
“रेतीवर आपण अलगद असावं आणि पाण्याने पायांवर येजा करावी,
तशी वेळ येऊन निघून जाते…
प्रवाहाशी मैत्री करायची की नाही, हे आपल्यालाच ठरवावं लागतं…”
या ओळींमधून Shivani Rangole जीवनातील संघर्ष, बदल आणि आत्मशोध यांचं सुंदर चित्र उभं करते. तिचा आवाज, तिचं सादरीकरण आणि शब्दांमधली खोली अनेकांना भावली आहे. व्हिडीओसोबतच तिने आपल्या चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचे आभारही मानले आहेत.
तिच्या या कवितावीडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी तिच्या काव्याभिव्यक्तीचं कौतुक करत, “तू फक्त अभिनेत्री नाहीस, तर एक संवेदनशील लेखिका आहेस,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या Shivani Rangole ‘कोहम’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. अभिनयाबरोबरच ती लेखन आणि कवितेतही रस दाखवते, हे या व्हिडीओवरून स्पष्ट होते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो, आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील संवेदनशील बाजू नेहमीच चर्चेत राहते.
हे पण वाचा.. मौनी रॉयच्या ‘बदमाश’ रेस्टॉरंट चेनचा दबदबा; ६ ठिकाणी व्यवसाय, पदार्थांच्या किमती ऐकून होईल आश्चर्य!
आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’नंतर ती कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु तिच्या या कवितावीडिओमुळे हे नक्की की, शिवानी केवळ अभिनेत्री नसून विचारांच्या खोल प्रवाहाशी संवाद साधणारी कलाकार आहे.
हे पण वाचा.. तारिणी मालिकेत नवा ट्विस्ट! ईरावर संकट, कौशिकीसमोर येणार का तारिणीची खरी ओळख?







