gashmeer mahajani prem nakalt hot nahi :मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक देखणा आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जाणारा Gashmeer Mahajani नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि अभिनय कौशल्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करून आहे. नुकतंच त्याने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर प्रश्नोत्तराचं एक सत्र घेतलं आणि यामध्ये विचारलेल्या एका प्रश्नावर त्याचं उत्तर विशेष चर्चेत आलं आहे.
गश्मीर महाजनी अनेकदा इंस्टाग्रामवर “आस्क गश” या नावाने चाहत्यांसोबत संवाद साधतो. या सत्रात एका चाहत्याने त्याला विचारलं, “‘फुलवंती’ सिनेमात जसं दाखवलं आहे, तसंच खर्या आयुष्यातही नकळत जर तू दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर?” या प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर अत्यंत स्पष्ट आणि ठाम होतं. तो म्हणाला, “प्रेमात पडणं हे कधीच नकळत होत नसतं.”
गश्मीर सध्या “फुलवंती” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याने शास्त्रीबुवांची भूमिका साकारली आहे. विवाहित असलेले शास्त्रीबुवा नकळत फुलवंतीच्या प्रेमात गुंततात, मात्र हे प्रेम ते कधीही उघड करत नाहीत. अखेर ते आपल्या पत्नीसोबत दूर निघून जातात आणि हे प्रेम अव्यक्तच राहून जातं. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडते. त्यामुळे चाहत्यानेही खऱ्या आयुष्यात असं घडल्यास काय कराल, असा प्रश्न विचारला होता.
पण गश्मीर महाजनिचं उत्तर ऐकल्यावर चाहत्यांनी त्याच्या विचारसरणीचं कौतुक केलं. त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दलही अनेकदा स्पष्ट मत मांडलं आहे. गश्मीरने २०१४ मध्ये गौरी देशमुखसोबत लग्न केलं असून त्याला एक मुलगाही आहे. कौटुंबिक आयुष्य आणि करिअर यामध्ये तो उत्तम समतोल राखताना दिसतो.
गश्मीर महाजनी हा फक्त मराठीच नाही तर हिंदी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरसुद्धा सक्रिय आहे. त्याचा चार्म आणि अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भावतो. त्यामुळेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित प्रश्न चाहत्यांना नेहमीच उत्सुक करतात. पण “प्रेम नकळत होत नाही” असं सांगून त्याने आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली आहे.
हे पण वाचा..महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहतांचे निधन; मुलगा सत्याची भावुक पोस्ट
gashmeer mahajani prem nakalt hot nahi










