shraddha ketkar tinnitus experience : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधील सुमन किल्लेदार म्हणजेच सुमन काकी ही भूमिका साकारणाऱ्या Shraddha Ketkar यांनी त्यांच्या अभिनयाने घराघरात ओळख निर्माण केली आहे. सहज, समंजस आणि वास्तवदर्शी अभिनयामुळे त्या प्रेक्षकांच्या विशेष आवडीच्या ठरल्या. मात्र, पडद्यामागे Shraddha Ketkar गेली अनेक वर्षे एका गंभीर आरोग्य समस्येशी झुंज देत आहेत, याची कल्पना फार कमी लोकांना होती. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी या संघर्षावर उघडपणे भाष्य केलं आहे.
Shraddha Ketkar यांनी सांगितलं की, सुमारे १७ वर्षांपूर्वी नाटक करत असताना त्यांना अचानक कानात सतत आवाज येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हा त्रास साध्या सर्दीमुळे असावा असं त्यांना वाटलं. मात्र, पुढील तपासणीत हा ‘टिनिटस’ नावाचा आजार असल्याचं निदर्शनास आलं. या आजारात कानात सतत शिट्टीसारखा किंवा घरघरल्यासारखा आवाज ऐकू येतो, जो कोणत्याही बाह्य कारणांशिवाय कायम सुरू असतो. Shraddha Ketkar यांनी सांगितलेला हा अनुभव अत्यंत त्रासदायक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारा होता.
या आजाराचा परिणाम त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर झाला. शूटिंगदरम्यान लांबून बोललेलं ऐकू येत नसे, दिग्दर्शकांच्या सूचना समजण्यात अडचणी यायच्या. हळूहळू या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावरही झाला. स्वतःमुळे इतरांना त्रास होतोय, अशी भावना मनात घर करू लागली आणि याच कारणामुळे Shraddha Ketkar यांनी काही काळ अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
उपचारांचे अनेक पर्याय तपासले गेले, मात्र त्यातून फारसा दिलासा मिळाला नाही. हा आजार कानातील एका विशिष्ट हाडाच्या हालचालींशी संबंधित असल्याने सर्जरीचा पर्यायही समोर होता. पण सर्जरी यशस्वी होईल आणि आवाज पूर्णपणे थांबेल याची खात्री नसल्याने त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही. त्याच काळात कुटुंबाची जबाबदारी, लहान मूल आणि प्रकृती या सगळ्यांचा विचार करून त्यांनी स्वतःला थोडा वेळ दिला.
या कठीण काळात Shraddha Ketkar यांना त्यांच्या पतीचा मोठा आधार मिळाला. त्यांनी कानासाठी मशीन वापरण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला संकोच वाटला असला, तरी हळूहळू त्यांनी ते स्वीकारलं. आजही त्या कस्टमाइज मशीनच्या मदतीने काम करत आहेत. मशीनमुळे ऐकण्यास मदत होते, मात्र टिनिटसचा आवाज अजूनही कायम आहे, हे त्या प्रामाणिकपणे मान्य करतात.
हे पण वाचा.. अभिजीत चव्हाण यांची नवी सुरुवात नवीन घरासोबत आलिशान EV कारची घेतली डिलिव्हरी, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
आज ‘ठरलं तर मग’सारख्या यशस्वी मालिकेतून Shraddha Ketkar पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या या संघर्षाची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. आजार असूनही हार न मानता काम करत राहणं, हीच त्यांची खरी ताकद असल्याचं या अनुभवातून स्पष्ट होतं.
हे पण वाचा.. बिग बॉस मराठीच्या ग्रँड लाँच प्रोमोमध्ये राधा पाटील ची झलक? पहिली स्पर्धक असण्याची जोरदार चर्चा









