subodh bhave tejashri pradhan onscreen chemistry kautuk : मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा चेहरा असलेला Subodh Bhave सध्या ‘वीन दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत झळकत असून दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावतेय. अलीकडेच झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दिलेल्या एका खास मुलाखतीत सुबोधने तेजश्रीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि तिचं मनापासून कौतुक केलं.
या मालिकेत सुबोध ‘समर’ तर तेजश्री ‘स्वानंदी’ची भूमिका साकारते. त्यांच्या व्यक्तिरेखांमधील नातं, संवादाची सहजता आणि नजरेतून व्यक्त होणाऱ्या भावना प्रेक्षकांना भावत आहेत. याच ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल विचारलं असता सुबोधने तेजश्रीचं कौतुक करत म्हणाला, “ती अतिशय गुणी, शिस्तप्रिय आणि स्वतःच्या कामावर मनापासून लक्ष देणारी कलाकार आहे.”
सुबोधने पुढे सांगितलं की तेजश्री फक्त संवाद पाठ करून सेटवर येत नाही, तर सीनमधील कन्टीन्युटी, मागील घटनांची दखल आणि एकूण वातावरणावर ती बारकाईने लक्ष ठेवते. “लहानसहान गोष्टींचं भान ठेवणारी आणि मालिकेला आपलं शंभर टक्के देणारी कलाकार तिच्यासोबत काम करताना मलाही नवं शिकायला मिळतं,” असं तो म्हणाला.
तेजश्री आणि सुबोधची ही जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र दिसत असली तरी प्रेक्षकांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी त्यांनी एका चित्रपटातून एकत्र काम केलं होतं, मात्र मालिकेतली त्यांची केमिस्ट्री वेगळाच ठसा उमटवत आहे. मालिकेतील स्वानंदी आणि समर या जोडीभोवती फिरणारी कथा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
सुबोधने मुलाखतीदरम्यान आपली अभिनय कारकीर्दही उलगडली. तो म्हणाला, “मला या क्षेत्रात २५ वर्षे झाली. झी मराठीवरची ही माझी १९वी मालिका आहे. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शिकायला मिळालं.”
दरम्यान, सुबोध भावेचा नुकताच ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. यानंतर तो नीम करोरी बाबा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातही झळकणार आहे.
हे पण वाचा.. लक्ष्मी निवास: भावना आणि सिद्धूच्या प्रेमाची रोमँटिक सफर – अखेर मनातील प्रेम व्यक्त होणार!
सुबोधच्या तेजश्रीबद्दलच्या या प्रतिक्रियेनं दोघांच्या चाहत्यांचा आनंद दुणावला आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन परस्पर आदराची भावना ही मालिकेच्या यशात महत्त्वाचा घटक ठरत असल्याचं अनेक प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा.. जयंतपासून सुटकेचा निर्धार! ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी घेणार मोठा निर्णय







