gaurav khanna patniche bhavnik post bigg boss 19 : ‘बिग बॉस १९’ सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चेत आहे. या सीझनमध्ये हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक ओळखीचे चेहरे, बॉलीवूड कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर एकत्र दिसत आहेत. यातील प्रत्येक स्पर्धक काही ना काही कारणामुळे चर्चेत राहतोच. त्यापैकीच एक लोकप्रिय नाव म्हणजे Gaurav Khanna. ‘अनुपमा’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला गौरव आता ‘बिग बॉस’च्या घरातही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गौरव सध्या शोमध्ये व्यस्त असला तरी त्याची पत्नी आकांक्षा खन्ना हिने नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली असून ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गौरव ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून आकांक्षाने त्याच्यासाठी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नव्हती. यामुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या शांततेबद्दल चर्चा सुरू केली होती. काहींनी तर तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. पण आता तिने इन्स्टाग्रामवरून आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आकांक्षाने गौरवसोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने लिहिले आहे, “जसं की तुला माहीत आहे, मी फार क्वचित कोणाची आठवण काढते, पण आज मला तुझी आठवण येते… तुझीच भुकी प्यासी आहे.” या भावनिक कॅप्शनमुळे चाहत्यांच्या मनात भावनांचा पूर आला असून पोस्टवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
आकांक्षा खन्ना स्वतःही अभिनेत्री असून तिने ‘स्वरागिनी’ आणि ‘भुतू’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तिची आणि गौरवची जोडी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडपींपैकी एक मानली जाते.
त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर ती अगदी चित्रपटासारखी आहे. दोघांची पहिली भेट एका ऑडिशनदरम्यान झाली होती. काही काळ एकमेकांना ओळखल्यानंतर आणि डेट केल्यानंतर त्यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कानपूरमध्ये विवाह केला.
हे पण वाचा.. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर १० वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांच्या आनंदाला भरारी
सध्या गौरव ‘बिग बॉस १९’च्या घरात असताना त्याची पत्नी बाहेरून त्याला पाठिंबा देत आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली असून सर्वजण गौरव आणि आकांक्षाच्या नात्याविषयी आपुलकीने चर्चा करत आहेत.
हे पण वाचा.. हर्षदा खानविलकरची माणसं टिकवण्याबाबत खास मते; “जर एकदा प्रेम केलं, तर ते आजन्म असतं”









